Ad will apear here
Next
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ
‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय क्रमांक

पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.

कोलकाता येथे नुकत्याच पार पडलेल्या या चित्रपट महोत्सवात ६० हून अधिक देशांतील विज्ञानपट आले होते. यातील शाळा-महाविद्यालय विद्यार्थी गटात कस्तुरी कुलकर्णीला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. झाडांभोवती निर्माण होणाऱ्या बुरशीचे महत्त्व, त्याचे पर्यावरणातील स्थान या विषयावर तिने ‘सिंबायोसिस’ हा लघुपट बनवला होता.
 
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम शाळेत शिकत असलेल्या कस्तुरीला लहानपणापासून अभिनयाचे वेड आहे. निर्माते, दिग्दर्शक राजू भोसले यांच्या विज्ञानविषयक शिबिरात ती नियमितपणे सहभागी होते. तिथेच तिला या विज्ञानविषयक चित्रपट महोत्सवाबद्दल माहिती मिळाली. पहिल्यांदा तिने या महोत्सवासाठी ‘आजीबाईंचा बटवा’ हा औषधांची माहिती देणारा लघुपट तयार केला होता. त्यात सीमा चांदेकर यांनी काम केले होते. इयत्ता नववीमध्ये असताना कस्तुरीने बेरीज वजाबाकी या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले, तसेच त्यात अभिनयदेखील केला आहे. हा चित्रपट येत्या १३ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZQACG
Similar Posts
सर्वांत मोठे कृषि प्रदर्शन ‘किसान’चे पुण्यात उद्घाटन पुणे : देशातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’चे पुण्यात बुधवारी, ११ डिसेंबर रोजी उद्घाटन झाले. दर वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
इला फाउंडेशनला आरबीएस अर्थ गार्डियन पुरस्कार पुणे : रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड अर्थात आरबीएस इंडिया कंपनीच्या वतीने नुकतेच यंदाच्या आरबीएस अर्थ हिरो पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये निसर्ग आणि पक्षी संवर्धन क्षेत्रासाठी दर्शवलेल्या बांधिलकीसाठी इला फाउंडेशनचा आरबीएस अर्थ गार्डियन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
‘कृषी विज्ञान केंद्रांमध्ये गो-विज्ञान केंद्र स्थापन करणार’ पुणे : ‘देशातील कृषी विज्ञान केंद्रांमध्ये केंद्र शासनाच्या पुढाकारातून गो-कृषी विज्ञान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून, गोशाळांना स्वावलंबी बनविण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे,’ असे मत राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांनी पुण्यात व्यक्त केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language